बंधुमाधव

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

१९४० नंतर जे दलित लेखक डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा विचार घेऊन आघाडीवर आले त्यात बंधु माधवांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कथा, कादंबर्‍या, नाटके त्यांनी लिहिली. `आम्ही ही माणसं आहोत’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाची एका वर्षात तिसरी आवृत्ती काढावी लागली. `विखारी भाकरी' ही त्यांची पहिली कथा. त्यात अस्पृश्यतेचे चटके, जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला आहे. `गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करुन देण्यासाठीच आपण लिहित आहोत' अशी प्रतिज्ञा घेऊनच ते वाटचाल करु लागले. `महारवतनी कथा' ही त्यांनी मराठी कथेला दिलेली देणगीच मानली जाते.

Hits: 569
X

Right Click

No right click