पाणी-जीवन निवेदन

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

पाणी-जीवन
लेखक
डॉ. विजय मोरेश्‍वर देशपांडे
प्राध्यापक (जनस्वास्थ्य अभियांत्रिकी)
विश्वेश्वरय्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
नागपूर: शासकीय मुद्रणालय
१९८२
----

निवेदन

मराठी भाबेला आणि साहित्याला आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या व सांस्कृतिक मूल्यांच्या आविष्कारांचे सामर्थ्य प्राप्त व्हावे, आधुनिक शास्त्रे, ज्ञान-विज्ञाने, तंत्र आणि अभियांत्रिकी त्याचप्रमाणे भारतीय प्राचीन संस्कृती, इतिहास, कला इत्यादी विषयांत मराठी भाषा सर्वच स्तरांवर ज्ञानदान करण्यास समर्थ व्हावी आणि मराठी भाषेला जगात उच्च स्थान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाने बहुविध वाड्मयीन व सांस्कृतिक कार्यक्रम आखला आहे. तो व्यवस्थितपणे कार्यवाहीत आणण्याकरिता वाडमय, ललितकला, समाजविज्ञान, विज्ञान, इतिहास इत्यादी विषयांवरील प्रकल्प साकार करण्यासाठी तसेच, मराठी वाङ्मयकोश व॒ शब्दकोश इत्यादी योजनांचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत.

याच दृष्टीने सर्वसामान्य माणसाला उपयुक्त होतील अशी विज्ञानविषयक पुस्तके प्रकशित करणेहो आवश्यक आहे असे मंडळाला वाटते. मंडळाच्या या धोरणानुसार मंडळाच्या विज्ञान समितीने सर्वसामान्य लोकांसाठी विज्ञानविषयक पुस्तके लिहून घेण्याची योजना आखली आहे. यामुळे सामान्य जनांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन त्यांच्या देनंदिन जीवनात येणार्‍या वैज्ञानिक गोष्टींची त्यांना केवळ ओळखच होणार नाहो तर आजचे विज्ञान रंजक व वाचनीय पद्धतोने त्यांना उपलब्ध
पण होईल. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पुस्तके पोहोचली पाहिजेत, अशी या मंडळाचो धारणा आहे. यासाठी मंडळाने प्राणीसृष्टीतील नवल, अनुवंशिकी, शेतकर्‍यांचे जीवन उजळून टाकणारा गोबर गॅस, आपला सूर्य, अणुशक्ती आणि अण्वस्त्रे यांचा परस्पर संबंध, जीवरक्षके (Antibiotics), निसर्ग आणि वनस्पती, कापडावरील विविध प्रक्रिया, वैनंदिन व्यवहारातील विज्ञान इत्यादी विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित करण्याचे योजिले आहे.

मानवी जीवनातच नव्हे तर प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टीतही पाण्याचे महत्त्व केवळ अनन्यसाधारण आहे. निरनिराळ्या विद्याशाखेत या विषयावर कितीतरी संशोधन झाले आहे. परंतु, शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास सर्वसामान्य माणसास “ पाणी ” या विषयासंबंधी अत्यंत त्रोटक ज्ञान असते. डॉ. विजय देशपांडे यांच्या “ पाणी-जीवन ” या पुस्तकामुळे ही त्रुटी भरून निघेल असे आम्हांस वाटते.

डॉ. देशपांडे यांनी हे पुस्तक सर्वांना पोषक होईल अशा दृष्टीकोनातूनच लिहिले आहे. पुस्तकामध्ये पाण्याविषयीची सांगोपांग माहिती आली आहे. रेखाचित्रे, तौलनिक तक्ते इत्यादींचा समावेश पुस्तकात असल्याने विषयाचे आकलन वाचकांना सहज| सुलभ होण्यास खूपच मदत होईल. जिज्ञासूंप्रमाणेच सर्वसामान्य वाचकासही या ग्रंथामुळे “ पाणी ” या महत्त्वाच्या विषयावरील जरूर ती माहिती मिळू शकेल असे मंडळास वाटते. डॉ. वि. मो. देशपांडे लिखित “ पाणी-जीवन ” हे पुस्तक जनतेला सादर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
डॉ. सुरेन्द्र बार्रालगे,
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ.
मुंबई:
विजयादशमी,
आश्‍विन १६, शके १९०३
गुरुवार, दिनांक ८ ऑक्टोबर १९८१.

Hits: 372
X

Right Click

No right click