पाणी - जीवन

प्रकरण २ - जीवरासायनिक क्रिया

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

माणसाच्या सेवनात येणारे वनस्पतीजन्य सेंद्रिय खाद्यपदार्थ सामान्यत: मोठ्या आकाराच्या रेणूंचे बनलेले असतात. हे पदार्थ ऊर्जाप्रदायी असल्यामुळे पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांचे सेवन अत्यावश्यक असते. परंतु रेणूचे मोठे आकार त्यांना कोषिकेत अवशोषित होण्यापासून परावृत करतात. अर्थातच त्यामुळ रेणूचा आकार लहान करणे जरुरीचे बनते. आकारमानातील हा अपेक्षित बदल प्रकिण्वाच्या प्रभावाखाली रासायनिक अभिक्रिया घडवून केला जातो. प्रकिण्वांच्या बरोबर पाण्याचीही कामगिरी तितकीच महत्त्वाची असते. खालील संमीकरणावरून ते अधिक सुस्पष्ट होईल :--
वनस्पतीजन्य सेंद्रिय संयुगे(कार्बोहायडरेटे/प्रथिने स्निग्ध पदार्थ) +पाणी --> प्रकिण्व --> लहान आकारांचे रेणू असलेले सेंद्रिय पदार्थे (ग्ल्कोज/ अमिनोअम्ल/अँसिटिक , अम्ल) +ऊर्जा (कॅलरीमध्ये)

सेंद्रिय संयुगांचा, समीकरणात दाखविल्याप्रमाणे आकार लहान झाल्यावर, कोषिकात शिरकाव होतो. कोषिकेत शिरकाव झाल्यानंतर वातापेक्षी पर्यावरणात ऑक्सिजनच्या प्रभावाखाली अपचयन-उपचयनादी अभिक्रिया सुरू होतात. या उपचयनांमुळे अन्नकणांचे 'ज्वलन' अंगर ' पचन” होते. या अभिक्रियासमूहांच्या प्रभावामुळे कोषिकेत पुनरपि सेंद्रिय संयुगे (कार्बोहायड्रेटे/प्रथिने/स्निंग्ध पदार्थ), कार्बनडायऑक्साइड, उष्णता व पाणी हे उपज पदार्थ खाली दिलेल्या समीकरणांप्रमाणे तयार होतात.
ऊर्जाप्रदायी अन्न + ऑक्सिजन प्रकिण्व ---> कार्बनडायऑक्साइड + पाणी + अमोनिया +-- ऊर्जा (कोषिकेतील)

किंवा

ऊर्जा अन्न +ऑक्सिजन प्रकिण्व --->कोषिकान्तर्गत सेंद्रिय संयुगे (ग्लायकोजेन|प्रथिने इ.) किवा नवकोषिका

अन्नाच्या अनुपस्थितीत शरिराच्या चलनवलनादी क्रिया सातत्याने चालू राहव्यात यासाठी 'आपत्कालीन अन्नसाठा' म्हणून अन्नपदार्थांपैकी सेंद्रिय संयुगे यकृत, स्नायू इ. ठिकाणी साठविली जातात तर कार्बनडाय-ऑक्साइड फूफ्फुसावाटे उच्छवासाबरोबर बाहेर टाकला जातो. उपजपदार्थापैकी शिल्लक राहिलेले पाणी आणखी बरीच काही कामे करण्यासाठी सज्ज असते. त्या कामांपैकी महत्त्वाचे काम म्हणजे ज्वलनकार्यात उत्पन्न झालेल्या उष्णतेचे त्वरीत वितरण. हे वितरण शक्‍यतो लवकर झाले नाही तर शारिरिक उष्णतामान एकदम वाढेल. तसे होऊ नये यासाठीच निसर्गाने पाण्याची योजना केली आहे. उपजपदार्थ म्हणून निर्माण झालेले पाणी ती उष्णता (ऊर्जा) अवशोषित करते व रक्‍त वाहिन्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्‍तावाटे शरिराच्या बाह्यभागाकडे, त्वचेकडे तिचे वितरण करते. त्वचेच्या निकट उष्णपाणी आल्यावर ते आजुबाजुच्या वातावरणाच्या संपर्कात येते व उष्णतेचे संतुलन होऊन अतिरिक्‍त उष्णता घामाच्या स्वरूपात बाहेर पडते.

पाण्याचे शरिरातील प्रमाण नेहमी संतुलित ठेवण्यात येते. वाजवीपेक्षा जास्त किवा कमी पाण्याचे प्रमाण लागलीच कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात भासमान्‌ झाल्याविना राहत नाही. कमी प्रमाणामुळे पाण्याची मागणी वाढते-मानव तृषार्त होतो व पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास ' फुगवट्याच्या ' स्वरूपात त्याची सूचना मिळते. नेहमीच्या पाण्याच्या प्रमाणात जरी ५ प्रतिशत्‌ घट झाली तर क्वचित्‌ प्रसंगी भ्रम होऊ लागतो. घट १५ टक्क्यांपर्यंत वाढली तर त्याचे पर्यवसान मृत्यूतही होते.

वर आपण प्राणिजीवनातील पाण्याचे महत्त्व बघितले. वनस्पतीजीवनातील प्रकाश संश्‍लेषण या महत्त्वाच्या अभिक्रिया समूहातही पाण्याचा वाटा फार मोठा असतो. वनस्पतींच्या कोषिकेत उपस्थित असलेली हरितद्रव्ये, कार्बनडाय ऑक्साइड, पाणी, अमोनिया यासारख्या असेंद्रिय रेणूंपासून कार्बोहायड्रेटे, प्रथिने निर्माण करतात. आकृती २.२ वरून ते सुस्पष्ट होईल. समीकरणाच्या स्वरूपात प्रकाशसंश्लेषण पुढीलप्रमाणे लिहिता येईल :-->

CO2 + 2H2O + सौरशक्‍ती' हरित्‌ द्रव्ये --> (CH2O)3+ H2O+O2
कार्बनडाय्‌ ऑक्साइड+ पाणी -->कार्बोहायड्रेटे+ पाणी + ऑक्सीजन

या अभिक्रियेसाठी लागणारी ऊर्जा सूर्य प्रकाशातील ४००० ते ७०००A0 या वेव्हलेंग्थ असलेल्या प्रकाशभागापासून मिळते. तयार झालेल्या कार्बोहायड्रेटांपैकी काही, कार्बोहायड्रेटे, स्निग्ध पदार्थ व प्रथिनांतही कालांतराने रुपांतरित होतात.

जीवनाशी असलेले पाण्याचे अतूट नाते बघितल्यानंतर त्या पाण्याच्या अलौकिक गुणधर्माचा अभ्यास करण्याचा मोह अनावर झाला नाही तरच नवल !

X

Right Click

No right click

प्रकरण २ - अन्नातील पाणी

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

प्रत्यक्ष पाण्याव्यतिरिक्‍त अन्नातूनही जवळजवळ १.१ लि. पाणी शरिरात जाते, हे आपण बघितलेच आहे. सेवन करीत असलेल्या अन्नात किती प्रतिशत पाणी असते याची कल्पना सारणी २.२ वरून अधिक स्पष्ट होईल.

अन्नावाटे अगर पिण्याच्या पाण्याबरोबर पोटात जाणारे पाणी म्हणजेच शरिरातील पाणी नव्हे. प्रत्येक जीवकोषिका, दोन कोषिकामधील अंतर, हाडामधील पोकळ नलिका, इतकेच नव्हे तर निरनिराळी उतके यामधे सापडणाऱ्या पाण्याचे प्रमाणही बरेच असते. या पाण्यामुळे शरिराच्या एकूण वजनात किती वाढ होऊ शकते हे सारणी २.३ मधे दाखविले आहे. रक्तवाहिन्यांची (नीला + धमन्या) ९६,००० कि. मी. लांबी सतत रक्ताने (पाण्याने ) व भरलेली असते ही एकच गोष्ट खूप बोलकी आहे.

सारणी २.२ : सेवन करण्यात येणाऱ्या पदार्थांमधील पाण्याचे प्रतिशत प्रमाण *
पदार्थ ----------------------------------------पाण्याचे पदार्थांचा वजनाशी प्रतिशत प्रमाण
सूर्यफुलाचे भाजलेले बी :
माणूस सेवन करू शकेल असा सर्वाधिक कोरडापदार्थ ---- ५
सफरचंद -------------------------------------- ८३-८४
द्राक्ष ------------------------------------------ ७८-७९
कलिंगड --------------------------------------- ९७
टोमॅटो ---------------------------------------- ९४
दूध : मातेचे ------------------------------------- ८८
शेळीचे --------------------------------------- ७७
गाईचे ---------------------------------------- ८७
म्हशीचे --------------------------------------- ७८
पालेभाज्या ------------------------------------ ६५-७५
गोमांस --------------------------------------- ६५
डकराचे मांस ---------------------------------- ५३
मेंढीचे मांस ------------------------------------ ६४
गहू ----------------------------------------- १४
ज्वारी --------------------------------------- ११
मका ---------------------------------------- ११.५
तांदूळ --------------------------------------- १२
--------------------------------------------------------------
* विन्थेन ब्लायथंड व इतर यांनी लिहिलेल्या “ Foods, their composition and analysis" र्‍या पुस्तकातून.

सारणी २.२: अवयवान्तर्गात पाण्यामुळे शरिराच्या एकूण वजनात होणारी प्रतिशत वाढ *
अवयव .. .. ..पाण्याच्या वजनामुळे होणारी प्रतिशत वाढ
कोणिका .. .. ..४१
रक्‍तपेशी .. .- .. ४
पोकळ्या (आंतडे व नेत्रगोलाभोवतीची मोकळी जागा) ---- ५

-------------------------------------------------------------
* व्हाईट, हॅडलर व स्मिथ यांच्या “ A Textbook of Biochemistry” या पुस्तकातून:

 

जीवरासायनिक क्रिया व त्यामघील पाण्याचा वाटा:

वनस्पती आणि प्राणिजीवनातील वाढ (वय व जाडी) किंवा त्यामध्ये होणारी हानी ज्या रासायनिक क्रियांमुळे शक्‍य होते त्या रासायनिक क्रिया शरिरान्तर्गत व सजीव कोषिकांद्वारा होत असल्यामुळे त्यांना “जीव रासायनिक अभिक्रिया” असे म्हणतात. या जीवरासायनिक अभिक्रिया मुख्यत्वेकरून द्विविध स्वरुपाच्या असतात. एक प्रकार विघटनात्मक तर दुसरा संघटनात्मक. विघटनात्मक अभिक्रियांमधे जीवद्रव्याचे-कोषिकेत असणाऱ्या द्रवपदार्थाचे विघटन होते. रेणूचा मोठा आकार असलेली सेंद्रिय संयुगे प्राणिजीवामधील अगर वनस्पती जीवामंधील कोषिकेत शिरण्यासाठी लहान आकारांच्या रेणूत ( उपजपदार्थ) रुपान्तरीत होतात.

उदाहरण द्यावयाचे झाल्यास स्टाचे अगर सेल्युलोजचे देता येईल. हे दोन्हीही पदार्थ मोठ्या आकाराच्या रेणूंनी बनलेले असल्यामुळे जसेच्या तसे कोषिकेत प्रवेश करू शकत नाहीत.

जीवरासायनिक अभिक्रियांमुळे त्यांचे प्रथमत : ग्लूकोज शर्करेत रूपान्तर होते व मग हे ग्लूकोज शर्करेचे लहान रेणू कोषिकेत प्रवेश करून कोषिकांना ऊर्जा पुरवू शकतात. ही अभिक्रिया नेहमीच 'ऊर्जाप्रदायी' असते.

याच्या उलट संघटनात्मक अभिक्रियांमध्ये कोषिकानिर्मिती अगर कॉर्बोहायड्रेटे, प्रथिने, यासारख्या रेणूंची निर्मिती होते. या पदार्थाच्या निमितीसाठी शर्करा, अमिनो अम्ले यांच्याबरोबरच ऊर्जेचीही गरज असते. या अभिक्रियांना म्हणूनच 'ऊर्जा-उपभोगी' असे म्हटले जाते. या दोन्हीही अभिक्रिया परस्परावलंबित असतात. या दोन्हीही अभिक्रिया समुच्चय स्वरूपात, अपचयन (विघटनात्मंक अभिक्रिया) व उपचयन (संघटनात्मक अभिक्रिया) म्ह॒गून ओळखल्या जातात. दोन्हीही अभिक्रिया-समुच्चय एकत्रितपणे 'उपापचयन' म्हणून परिचित आहेत.

प्रकरण २ - जीवसृष्टी अन्‌ पाणी

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

जीवसृष्टी अन्‌ पाणी यांचे अन्योन्य संबंध

जीवसृष्टीची उत्पत्ती झाली तीच मुळी पाण्यात ! जीवसृष्टीतील प्रत्येक घटकांचा अगदी त्याच्या जन्मापासून पाण्याशी संबंध आलेला आहे. अनेक पुराव्यांच्या सहाय्याने सिद्ध झालेल्या या जीवशास्त्रीय सिद्धान्ताला प्राचीन संस्कृत वाङ्मयातही बराच आधार सापडतो. 'अप एव ससर्जादौ तासू बीजमवासृत्‌ । ' (मनुस्मृति १) हे वचनही हेच सांगते की, आधी पाणी निर्माण केले व नंतर त्यात जीव जन्मास घातले. पाण्याला समानार्थी असलेल्या 'जल' या शब्दाची व्युत्षत्ती बघितली तरी याच सिद्धान्ताची यथार्थंता पटवून द्यावयास मदत झालेली दिसते. जल म्हणजे 'जायते अस्मात्‌' यातून सर्व जन्म पावतात; व 'लीयते अस्मिन' यातच सर्व विलीन होतात.

वनस्पतिविभाग वा प्राणिविभाग ही मानवाने आपल्या सोयीसाठी केलेली जीवसृष्टीची अगदी कृत्रिम विभागणी आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून ही दोन्हीही त्याचीच लेकरे ! वनस्पतिसृष्टी काय किवा जीवसृष्टी काय, त्यांच्यातील पहिला जीव-मूळजीव-- (दोन्हींचा पूर्वज )-हा एकच आणि तो होता 'जलचर'. प्राणीसृष्टीत दिसणारे भूचर (जमिनीवर राहणारे) वा 'खेचर' (अवकाशात उडूं शकणारे) ही त्यांची मागाहून झालेली विकसित स्वरूपे आहेत.

परमेशाला संतुष्ट राखण्यासाठी मानवाने नवविधा भक्तीचा वापर केला. पाण्याने देखील त्याच रीतीने नवविध प्रकारांनी मानवावर अनुग्रह चालू ठेवला आहे (प्रकरण १ पहा). या नवविध प्रकारांची ओळख करून घेण्यापूर्वी मानवाचा किंवा एकूण जीवसृष्टीचा पाण्याशी किती घनिष्ट संबंध आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल.

वनस्पतिसृष्टी :

कित्येक हजार वर्षांपूर्वी झालेली जीवसृष्टीची उत्पत्ती समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या एककोषिक शेवालसदृश वनस्पतीपासूनच झाली असा दृढ समज आहे. यातूनच पुढे प्राणि-सृष्टी व जमिनीवर वाढणाऱ्या बहुकोषिक वनस्पती उत्क्रांत झाल्या. शेवाळे पाण्याविना जगूंच शकत नाही. याचसाठी त्यांना पाणवनस्पती म्हणून ओळखले जाते. पाण्याच्या सतत संपर्कात असल्याने या वनस्पतींच्या कोषिका पाणी शोषून घेतात व त्यामार्फत जीवनावश्यक अन्नद्रव्ये मिळवितात. कोषिकांमधील पाण्याचे प्रमाण खूप म्हणजे त्यांच्या वजनाच्या ९५ प्रतिशत इतके असते.

वनस्पती विभागातील निरनिराळ्या जातींच्या वनस्पतींचा सखोल अभ्यास केल्यास एक गोष्ट ठळकपणे दिसून येते की, वनस्पतींचा आकृतिबंध मुख्यत्वेकरून पाण्याच्या न्यूनतेवर,आधिक्यावर किवा ते मिळण्याच्या सुलभतेवर अवलंबून असतो. बहुकोषिक वनस्पतींमधील सर्व प्रकारचे संचरण पाण्याच्या माध्यमामुळेच सुलभ होते. जीवनावश्यक द्रव्यांच्या -कार्बोहायड्रेट अगर पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ-निर्मितीसाठी लागणारी खनिजे झायलेम उतकांमधूत मुळांपासून पानापर्यंत पोहोचविण्यासाठी किंवा वर उल्लेखिलेले उपजपदार्थ पानांपासून मुळापर्यंत फ्लोएम उतकांमधून पोहोचविण्यासाठी पाणी अत्यावश्यक - असे माध्यम आहे. याच कारणामुळे पाण्याच्या राशीचा-परिमाणाचा झाडांच्या आकृती-बंधावर प्रभाव पडतो. पाण्याची दुर्मिळता, वनस्पतींना आपला जीवनपट एका वर्षापुरताच सीमित करावयाला भाग पाडते. पावसाळ्यात एकदाच मिळणा-या पाण्याचा या वनस्पती पुरेपुर उपयोग करून घेतात. त्या बहरतात, फुलतात, फळतात आणि वर्षा अखेरीस जळून जातात. वंश खंडित होऊ नये म्हणून बिया तेवढ्या मागे ठेवून जातात.

त्या मात्र पाण्याशिवायही जगू शकतात. या वनस्पती आयुष्याच्या उभारीत एखाद्या कृपणाप्रमाणे पानाचा तळवा उघडा न करता मूठ वळल्यासारखा छोटा करून ठेवतात. तसे करणे भागच असते त्यांना. नाहींतर मोठा पृष्ठभाग सूर्याला संमुख राहिल्यास पारवसनावाटे खूपसे पाणी नाहक बाहेर नाही कां फेकले जाणार? पानांची जागा काट्यांसारख्या लहान अवयवांनी घेतलेल्या जशा वनस्पती असतात तशाच पानांऐवजी पाण्याचा साठा करण्यास खोडांच्या रचनेत बदल करणारे निवडुंगही कांही कमी नाहीत. झुडुपे, झाडे किवा वृक्ष यांचा डौल देखील ठरविते ते जमिनीतील पाणीच. दृश्यभागाचा ताठा त्यांच्याच (पाण्याच्या) हातात असतो. जमिनीवरील झाडांची ऊंची जितकी अधिक तितक्‍या अधिक प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी त्या झाडाला आपली मुळे जमिनीत अधिक लांबवर पसरावी लागतात. भूगर्भात पाण्याचा साठाच नसेल तर झाडाचा ताठा राहणार कसा ?

रायवृक्षाच्या बाबतीत असे आढळून आले आहे की, उंची व ताठा कायम ठेवण्यासाठी त्याच्या मुख्य मुळाला हजारो इतके दुय्यम लहान लहान मूलरोम फुटतात व त्यांच्यामुळे ६०० कि. मी. जागा व्यापू शकतील एवढे मोठे मुळांचे जाळे जमिनीत तयार होते. वाढ होत असलेल्या कोणत्याही एका मोसमात एक झाड त्याच्या वजनाच्या २० पट पाणी शोषून घेते.

प्राणिसृष्टो :
प्राणिसृष्टीच्या बाबतीत जलचरापासून भूचरापर्यंत (मासे-बेडूक-मानव) झालेले स्थित्यंतर ' पुनरावर्तन सिद्धान्ताच्या ' रूपाने मानवी आयुष्यात स्पष्टपणे दिसून येते. गर्भाशयात असताना पाण्याच्या आवरणात सुरक्षित असलेला 'अवलंबित जीव ' जेव्हा मुक्‍त आयुष्य व्यतित करण्यासाठी मातेच्या उदराबाहेर येतो तेव्हा त्याचे जलचरातून भूचरात रूपान्तरच झालेले असते. भूचरात रूपांतर झाल्यानंतरही “ जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” या न्यायाने मानवाचा पाण्याशी असलेला संबंध तसाच अतूट राहतो. जिवंत असेपर्यंत मानवी देहातील चैतन्याची ग्वाही देते ते रक्‍तस्रावाने सळसळणारे पाणीच ! हवेचा एकमेव अपवाद सोडल्यास माणसाच्या आयुष्यात पाण्याइतके अनन्यसाधारण महत्त्व कुठल्याही अन्य पदार्थाला देता येणार नाही. हवा, पाणी व अन्न या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या गोष्टींची टक्केवारी पाहिली तर प्रत्येक माणूस ८० प्रतिशत्‌ हवा, १२ प्रतिशत्‌ पाणी व फक्त ८ प्रतिशत्‌ अन्न सेवत करतो (आकृति २'१). अन्नाविना ८० दिवस जगू शकणारा माणूस पाण्याविना मात्र १० दिवसही जगू शकत नाही-

X

Right Click

No right click

प्रकरण २ - शरीरातील पाणी

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

कोषिकांतर्गत व आंतरकोषिक द्रव, रक्‍त इत्यादी स्वरूपात असलेले पाण्याचे सरासरी प्रमाण कोणत्याही मानवी शरिरात त्याच्या वजनाच्या ६५ प्रतिशत असते. हे प्रमाण माणसामाणसात किंवा प्रत्येक अवयवात थोड्या फार प्रमाणात बदलणे सहज शक्‍य आहे.

पुरुष आणि स्त्री यांच्या शरिरातील पाण्याच्या प्रमाणातही लिगभेदानुरुप फरक असल्याचे आढळून येते. स्त्रियांच्या शरिरात जलधारण करण्यात तितकीशी कार्यक्षम नसलेली वसोतके अधिक असल्याने पाण्याचे प्रमाण कमी आढळते. त्यांच्या शरिरात एकूण वजनाच्या फक्त ५२ प्रतिशत्‌ पाणी आढळते. पुरुषांमध्येही हे प्रमाण व्यक्तिसापेक्ष असते. वरपांगी कृश दिसणार्‍या पुरुषात पाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त, म्हणजे वजनाच्या ७० प्रतिशत्‌ असते. सर्वसामान्य स्वरूपात बघितले तर कोणत्याही पूर्ण वयात आलेल्या मानवाच्या शरिरात अंदाजे ५० लि. पाणी असते. या पाण्यापैकी अंदाजे ३ लि. पाणी सारखे बदलत असते. निः:सारित होणार्‍या व अंतर्वेशित होणाऱ्या पाण्याचे प्रमाण साधारणतः सारखेच असते. याचाच अर्थ रोज साधारणतः ३ लि. पाणी निरनिराळ्या रूपाने शरिरात घेतले जाते व तितकेच बाहेरही टाकले जाते. शरिरात नव्याने येणाऱ्या वा तयार होणार्‍या पाण्याची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल :---

अंतर्वेशित होणारे पाणी =१.७ लि. पिण्याच्या पाण्यावाटे जाणारे +१.१ लि. अन्नावाटे जाणारे +०.२४ लि. अन्नाच्या पचनामुळे शरिरात तयार हाणारे पाणी.= एकूण, शरिरातील पाणी ३.०४ लिटर.

उच्छ्वास, घाम, मूत्र इत्यादींच्या स्वरूपात निःसारित होणाऱ्या पाण्याचे परिमाण अंदाजे, तितकेच म्हणजे ३ लि. असते. अशा रीतीने शरिरातून बाहेर टाकल्या जाणार्‍या पाण्याची विभागणी पुढीलप्रमाणे असते :--
- उच्छवासाच्या रुपाने - ०.४५ लि. म्हणजेच, १५ प्रतिशत.
- घामाच्या रूपाने (उष्ण हवामानात हे प्रमाण ३३ प्रतिशततेपर्यंत वाढते) - ०.६५ लि. म्हणजेच, २० प्रतिशत.
प्रत्यक्ष निःसारित पाणी.- १.१५ लि. म्हणजेच, ६५ प्रतिशत्‌
प्रतिदिन एकूण निःसारित झालेले पाणी- १'५ ते २.५ लि. च्या आसपास. ,
मानवी शरिरातील निरनिराळ्या उतकांमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण सारणी २.१ मधे दाखविले आहे.


सारणी २. १: निरतिराळ्या उतकांमधोल पाण्याचे प्रतिशत प्रमाण *
उतके -------------------प्रतिशत पाणी
मेंदू : धूसर द्रव्य ----------. ८४
श्वेत द्रव्य ---------------- ७०
मुत्रपिंड ----------------- ८१
ऱ्हीय उतके--------------- ७९
फुफ्फुसे ---------------- ७८
उदर व आंतडे ------------ ७५
यकृत ------------------. ७४
त्वचा ------------------- ७७
संपूर्ण सापळा------------- ४५
हाडे (मज्जाविरहित) ------- २२.५
------
* पी. एम. मिचेल यांच्या "A Textbook of Biochemistry” आवृती २ री, १९५० मधून.

प्रकरण - १ पाण्याचे परिमाण कोष्टके ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

सारणी १. ३: भारतामधील नागरी पाणोपुरवठ्यासंबंधा तील आकडवारो (प्रांतश:)*

प्रांत वा राज्य
/ केंद्रशासित प्रदेश
एकूण नगरे लोकसंख्या
(लक्षांत)
नळावाटे पाणीपुरवठा
होत असलेली
एकूण नगरे
लोकसंख्या
(लक्षांत)
१ आंध्र २०७ ८४.०२ ७९.०० ५५.००
२ आसाम ६९ १२.८९ १४.०० २.४६
३ बिहार १६१ ५६.३४ ६७.०० २८.०९
४ गुजराथ २१६ ७४.९७ १०२.०० ६३.४९
५ हरियाणा ६५ १७ .७३ ६१.०० १३.४४
६ हिमाचल ३५ २.४२ ३४.०० २.३८
७ जम्मू व काश्मीर ४५ ८.५८ ४५.०० ८.००
८ कर्नाटक २३५ ७१.२२ १८०.०० ६३.००
९ केरळ ८८ ३४.६६ ४९.०० १६.३१
१० मध्यप्रदेश २४३ ६७.८५ ९२.०० ४५.००
११ महाराष्ट्र २८९ १५७.११ १७३.०० १४१.००
१२ मणिपूर १.४१ ४.०० १.२२
१३ मेघालय १ .४७ ४.०० ०.५६
१४ नागालेंड ०.५१ २३.०० ०.२९
१५ ओरिसा ८० १८.४५ ६०.०० १२.७०
१६ पंजाब १०८ ३२.१६ ५३.०० २२.०६
१७ राजस्थान १५७ ४५.४४ १५१.०० ४०.००
१८ तामिळनाडू ४३९ १२४.६५ १७० ९५.००
१९ त्रिपुरा १.६२ २.०० ०.७२
२० उत्तर प्रदेश २९३ १२३.८९ १८०.०० ८७ .२०
२१ प. बंगाल १४० १०९.६७ ४१.०० ९२.००
२२ अंदमान, निकोबार ०.२७ १.०० ०.२६
२३ अरूणाचल ४ ०.१७
२४ चंदीगड २.३३ १.०० २.३३
२५ दाद्रा, नगरहवेली
२६ दिल्ली ३६.४७ १.०० ३६ .४७
* २७ गोवा, दिव, दमण १३ २.२७ ११.०० २.०५
२८ लक्षद्रीप
२९ मिझोराम ०.३८ १.०० ०.२०
३० पॉडेचरी १.९८ ६.०० १.२८

* पब्लिक हेल्थ इंजिनियरिंग बुलेटीन, मे-जून १९७६.

X

Right Click

No right click