२३. मुंबई १९३८ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Parent Category: साहित्य संमेलने
माझ्या सोयीसाठी मी वाङ्मयाचे वस्तुनिष्ठ व रसनिष्ठ असे दोन भाग करतो. वस्तुनिष्ठ वाङ्मय हे वस्तूचे छायाचित्र, चित्र नव्हे. परंतु ललित वाङ्मय हे कल्पित रंग भरलेले चित्र होय. रसोत्कर्ष हाच त्याचा विशेष. कल्पनेची मनसोक्त भरारी हा रसनिष्ठ वाङ्मयाचा गुण होऊ शकेल..