Designed & developed byDnyandeep Infotech

आश्विन

Parent Category: मराठी संस्कृती
विजयादशमी (दसरा)

राक्षसांचा राजा दुर्गासूर यानं तप करून ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला की, `त्रिभुवनात तुला कोणीही वीर पुरूष जिंकू शकणार नाही. या वरामुळे दुर्गासुर एवढा प्रबल झाला की, त्याने इंद्र, चंद्र, वरूण, व यम यांना बंदी केले.' अखेर दुर्गासुराच्या वधासाठी पार्वतीने वेगळे रूप घेतलं व त्या रूपाला `विजया' असे नांव दिले. तिला विविध शस्त्रांनी सज्ज केले. शंकराने आपला त्रिशुळ दिला. विष्णुने आपले सुदर्शन चक्र व कवच दिले. अशाप्रकारे प्रत्येक देवाने आपली वेगवेगळी शस्त्रे दिली.

ही सर्व शस्त्रे पेलण्यासाठी पार्वतीने आठ बाहू धारण केले. या अष्टभुजा धारण केलेल्या पार्वतीने नऊ दिवस लढून दहाव्या दिवशी दुर्गासूराचा नाश केला. सगळीकडे आनंद झाला. तो आनंद प्रकट करण्याकरिता नवरात्र व दसरा साजरा करतात.

कोजागिरी पौर्णिमा

आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी रात्री इंद्राची पूजा करतात. पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वी वर उतरते व `को जागर्ति'? कोण जागं आहे? असा प्रश्न विचारते जो जागा असेल त्याला जी धनधान्य देते. यावरून कोजागिरी पौर्णिमा असे नांव पडले.


आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र असते व स्वच्छ चांदण असते अशा चांदण्यारात्री इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या दृष्टीने हा उत्सव साजरा करतात. राजस्थान मध्ये स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र धारण करून चांदीचे अलंकार घालण्याची प्रथा आहे.

 

X

Right Click

No right click