Designed & developed byDnyandeep Infotech

सुविचार - ७

Parent Category: मराठी साहित्य
आजचा पुरूषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे.
गर्वाने देव दानव बनतात, तर नम्रतेमुळे मानव देव बनतो.
धैर्य ही आनंदाची चावी आहे.
अनेक मूल्यवान पदार्थांनी भरलेले विश्व जरी मनुष्याला दिले, तरी त्याचे समाधान होणार नाही, कारण मोह हा अनिवार्य आहे.
चालीरीती म्हणजे सद्गुणांच्या पडछाया.
त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीवाचून प्रगती नाही.त्यागाची शक्ती हेच अलौकिकत्व.
परमार्थामध्ये अधिकार कोणी कोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो.
लांब जीभ आयुष्य कमी करते.
ज्ञान दाखविण्यापेक्षा, अज्ञान लपविणे कठीण असते.
कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमानकाळाची पत्नी आणि भविष्यकाळाची माता असते.
अहंकार हा तपसाधनेचा महान शत्रू आहे.
विचार परिपक्व झाले की शब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरवता येतात.
ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे आणि कलेशिवाय जीवन नीरस आहे.
भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.
प्रतिभा ही अनंत परिश्रमाने सामावलेली असते.
सत्याचा शेवट सुख-समाधानाच्या वाटेने जातो.
अचल प्रीतीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही.
ढोंग म्हणजे सद्गुणापुढे दुर्गुणाने स्वीकारलेली हार आहे.
दु:ख अनावर झाले की माणसाला हसू येते, आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते.
लबाडी केल्यामुळे तात्पुरते फायदे होतात, पण कायम स्वरूपाच्या कल्याणाचा नाश होतो.
पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवावा.
कामक्रोधांना आपसात लढवून मारणे यात ज्ञानाचे कौशल्य आहे.
महत्वाकांक्षेला किल्ली दिल्यावर संकटांचे, नशिबाचे काटे आपोआप फिरतात.
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे, तर घामाच्या धारांनी.
खुशामत जो करतो व जो करून घेतो ते दोघेही आपले व्यक्तिमत्व भ्रष्ट करतात.
समजूत व विवेक यांचा साहजिक परिणाम संभाव्य आपत्तीविरूध्द वेळेवर उपाय योजणे हा होय.
चांगली, योग्य पत्नी म्हणजे कुटुंबाची शोभा व घराची लक्ष्मी असते.
मनुष्याच्या मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो, बाकी सर्व नष्ट होते.
हिंमत ही अंत:करणातून निर्माण होणारी वस्तू आहे; संपत्तीच्या आकड्यात निर्माण होणारी नाही.
नावे ठेवणे सोपे आहे; परंतु नाव कमावणे अवघड आहे.
X

Right Click

No right click